कळला ना काळ,
कुणाला ना कळली,
त्याची किमया...
काळोखाच्या गर्द छायेत,
तोच आहे, त्याचा किनारा.
तोच देतो घाव
मनावर...
तोच बनतो,
फुंकर..
तोच आहे घात,
कुणाचा..
तोच देतो सोबत.
तोच आहे,
जय-जयकार
दीनाचा...
तोच आहे,
मुक्काम,
मनाचा...
तोच आहे,
आक्रोश...
वेदनांचा,
तोच आहे
जल्लोश...
भावनांचा.
तोच आहे,
दसरा – दिवाळी,
सणाचा...
तोच आहे,
शिमगा...
अपुरेपणाचा.
काळच शिकवितो
जगणे-मरणे
तोची शिकवितो,
मरूनही जगणे.
तोच बोलतो,
तोच चालतो.
ऐकत नाही कोणाचे.
काळापुढे चालत नाही,
काहीही मनाचे.
काळाच्या ओघात
बदललात संदर्भ,
जगण्याचे...
संदर्भांनुसारच
राहणे-वागणे
असते विवेकाचे.
काळच बदलतो
करतो अनुपालन
निसर्ग नियमांचे
‘परिवर्तनशिलतेचे'.
- ©️ प्रा. शिवाजी आर. कांबळे
☎️ मो.न.8830800335
No comments:
Post a Comment